ग्लिरिसिडिया/गिरीपुष्प/खताचे झाड/उंदीरमारीझाड

शेतीविषयक माहितीरासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच जि सेंद्रिय खाते आहेत यांच्याही किमती वाढत चालल्या आहेत (शेण खत ,गांडूळ खत) पण आपल्या शेताचा पोत टिकून ठेवायचा असल्यास आपल्याला सेंद्रिय खतांची आवश्यकता भासते त्यासाठी हिरवळीची खते ही उत्तम पर्याय ठरू शकतात

गिरीपुष्प या झाडास खताचे झाड म्हणून सुद्धा ओळखतात. जवळपास यात 2.7%नत्र, 36% सेंद्रिय कर्ब, स्फुरद 0.5%, पालाश 1% असते . नत्र युक्त खतात बचत करण्यासाठी गिरीपुष्पचा पाला खूप महत्वाचा आहे.

गिरीपुष्प चे फायदे
मुख्य अन्नद्रव्य(नत्र ) पुरवते
जमिनीची धूप कमी होते
पाला कुजताना उष्णता निर्माण होते त्यामुळे जि उपद्रवी कीटक असतात त्यांचा नायनाट होतो
जमीन सुधारण्यात मदत होते
मातीची पानी व अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
मातीचे भौतिक रासायनिक जैविक कोणतेही प्रदूषण होत नाही

गिरिपुष्पाची लागवड शेतजमिनीत करणे फायदेशीर ठरते. कारण त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते, तसेच खडकांची झीज होऊन जमीन चांगल्याप्रकारे तयार होण्यासही मदत होते.

झाडाची लागवड दोन पद्धतीने केली जाते.

१) पद्धत छाट कलम तयार करणे – छाट कलम तयार करण्याच्या पद्धतीत झाडाचे छाट कलम साधारणपणे एक वर्ष वयाच्या झाडापासून किंवा त्याच्या फांदीपासून तयार करावे. फांदीची जाडी 1.5 ते 2 सें.मी. व लांबी 50 ते 100 सें.मी. असावी.
लागवड करताना छाट कलमाची खालची बाजू जमिनीत साधारण 20 ते 50 सें.मी. खोल रुजवावी. लागवड पावसाळ्यात जमिनीत ओलावा असताना करावी. दोन झाडांतील अंतर 50 सें.मी. ठेवावे.

२) झाडांच्या बियांपासून रोप तयार करून करता येते – बियांपासून रोप तयार करण्यासाठी गिरिपुष्प झाडाच्या बिया उपलब्ध करून त्या आठ ते दहा तास पाण्यात भिजत घालाव्या. त्यानंतर लाल माती, रेती आणि शेणखत यांचे 1 : 1 : 1 या प्रमाणात मिश्रण तयार करून साधारण 500 ग्रॅम मिश्रण प्लॅस्टिक पिशवीत भरावे व त्यामध्ये टोकन पद्धतीने लागवड करावी आणि नियमितपणे पाणी द्यावे. गिरिपुष्पाचे रोप तीन ते चार महिने वयाचे झाल्यानंतर पावसाळ्यात लागवड करावी.

हे झाड वेगाने वाढत असल्यामुळे छाटणी करणे आवश्‍यक आहे. साधारणपणे एक वर्ष वयाचे झाल्याबरोबर छाटणी करावी. छाटणी करताना जमिनीपासून 60 ते 75 सें.मी वरून करावी. या झाडाची छाटणी वर्षांतून तीन वेळा करावी. जून, नोव्हेंबर व मार्च या तीन महिन्यांत छाटणी केल्यानंतर हिरवी पाने व फांद्या बारीक कापून याचे मिश्रण तयार करावे व नंतर ते जमिनीत किंवा मातीत मिसळून द्यावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व त्या सोबत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून जमिनीचे जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मांमध्ये अनुकूल बदल होतो. जमिनीची सुपीकता वाढते. तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. याचा फायदा रासायनिक खतांवर व ओलितावर होणारा खर्च कमी करता येतो.

पाला लवकर कुजतो : गिरीपुष्प चापाला शेतात टाकल्यावर १५ ते २० दिवसांतच कुजतो. हा पाला सरीमध्ये टाकल्यानंतर डवरणी करावी. त्यामुळे पाला मातीत मिसळतो. त्याचे रासायनिक गुणधर्म दिसतात. शेतीची सुपीकता कायम राहून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते.

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!